Thursday 28 May 2015

२८  मे २०१५ आई  स्मृती दिनाचे दुसरे वर्ष
         स्मरण
आई निघून गेली अचानक आठवणींचा डोंगर सोडून गेली. आई कडून   बरेच  प्रेमाने  कसे राहायचे व आलेल्या माणसांचे आदरात्तीथ्या कसे करायचे हे माहित पडले . तसेच मेहनत घेऊन धन्दाशेती कशी सांभाळायची, भांडी स्वछ्करून केर कचरा काढून    घराला घरपण आणून  पोरे बाळे  सांभाळून आपली कामे आटोपशीर कशी  होतील ह्याचे  ज्ञान मिळाले .  तुझे आदर्श ईमान्दारी कसलेली मेहनत व वेळी अवेळी काम करण्याची क्षमता पाहून मलाही हिम्मत आणि ताकत येत होती व काम करण्याचा उत्साह वाढत होता व  थकवा पार निवळून जायचा . तुझ्या आशीर्वादानेच सर्व काही ठीक चालत आहे जसेच्या तसेच काम धंदे चालले आहेत  तरीपण तुझी कमी कधीच भरून निघणार नाही आणि उणीव नेहमीच राहील. तुझा धडाडीपणा  आणि  साधेपणा व झटपट काम आटपण्याची  क्षमता हे कधीच विसरणार नाही . तुझे आधात्मिक ज्ञान व अचानक मला सांगायची पूजा घालू या मी भटजी बोलावला आहे व पूजेचे सामान   आणि दुर्वा  तुळस आपण मोजून चौरंग मखर तयार करून  दुपारी ३ वाजता पूजा ठेवायची आहे. वर्षातून तुज्या हातून ३-४ पूजा होत होत्या हे मी कधीच माझ्या आयुष्यात विसरणार नाही.  देव तुझ्या आत्म्यास शांती देवो.

Tuesday 5 May 2015

5th MAY  2015 - सदैव सैनिका पुढेच जायचे

 0-Tukojirao_III_Maharaja_Holkar_of_Indore 300px-Afghan_royal_soldiers_of_the_Durrani_Empire 300px-Surrender_of_Tipu_Sultan Mountbatten 23s-musketeers-after-attacking-pakistyan1 440px-Sambhaji_Maharaj 1971-vijay-diwas-india-liberates-bangladesh-surrender-of-pakistan 440px-River_Crossing_NGM-v31 440px-SIVAJI_OPENLY_DEFIES_THE_GREAT_MOGHUL 1971T-55_tanks_in_the_Bangladesh_Liberation_War H.H._Shahu_Chhatrapati_Maharaj Emperor_of_Maratha_India attack-on-portuguese mumbaiBombay_Policeman kulaba mumbaiPolice_Inspector Ncc_dress_out nccgetimage panhala bajiprabhu pan shiv war end Rani Tarabai (2) panShivaji_Maharaj_and_Baji_Prabhu_at_Pawan_Khind shambhu-raje panSivaji_and_Army 440px-Maratha_Solider red netaji books1 0Kabul-Last-stand O3m_AryaSamaj ladh 

सदैव सैनिका पुढेच

सदैव सैनिका पुढेच जायचे
न मागुती तुवा कधी फिरायचे

सदा तुझ्यापुढे उभी असे निशा
सदैव काजळी दिसायच्या दिशा
मधून मेघ हे नभास ग्रासती
मधेच या विजा भयाण हासती
दहा दिशांतुनी तुफान व्हायचे

प्रलोभने तुला न लोभ दाविती
न मोहबंधने पदांस बांधिती
विरोध क्रोध वा तुला न थांबवी
न मोह भासतो गजांत वैभवी
न दैन्यही तुझे कधी सरायचे

वसंत वा शरद तुला न ती क्षिती
नभांत सूर्य वा असो निशापती !
विशीर्ण वस्‍त्र हो विदीर्ण पावले
तरी न पाय हे कधी विसावले !
न लोचना तुवा सुखे मिटायचे

नभात सैनिका प्रभात येउ दे
खगांसवे जगा सुखात गाउ दे
फुलाफुलांवरी सुवर्ण शोभु दे
जगास शांतता सुहास्य लाभु दे
न पाय तोवरी तुझे ठरायचे

  1. Sadaiv Sainika Pudhech Jayache सदैव सैनिका पुढेच ...

    www.youtube.com/watch?v=_A8OFRl6Vto
    Jan 19, 2014 - Uploaded by Laxmikant Mhaskar
    Sadaiv Sainika Pudhech Jayache सदैव सैनिका पुढेच जायचे, न मागुती तुवा कधी फिरायचे. Laxmikant Mhaskar.
    In order to show you the most relevant results, we have omitted some entries very similar to the 5 already displayed.
    If you like, you can repeat the search with the omitted results included.

    १३ ऑगस्ट १८९०  ते  ५ मे १९१८ बालकवि उर्फ़ त्र्यंबक बापूजी ठोमरे - निसर्ग  कवि म्हणून प्रसिद्ध 


    बालकवी

    (१३ ऑगस्ट १८९० ते ५ मे १९१८)
    बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोमरे. निसर्गकवी म्हणून प्रसिद्ध.

    bal kavi.jpg
    निसर्गकवी म्हणून अढळ स्थान मिळालेल्या बालकवींनी आनंद आणि उदासीनता या दोन्ही भावनांना आपल्या कवितांमधून पकडून ठेवलं. अल्पायुषी ठरलेल्या बालकवींची कविता निसर्गातील प्रतिमांच्या आसपासच फिरली, पण त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीच्या नि शब्दकळेच्या जोरावर निसर्गातील निरागसता कवितेत आणली. मग आनंद असो की उदासीनता, या दोन्ही भावना त्यांच्या कवितेत निरागस होऊन येतात. निसर्गाला मानवी भावभावनांची जोड दिल्याने बालकवींची कविता रूढ अर्थाने दिसणाऱ्या निसर्गवर्णनापेक्षा वेगळी ठरली. ‘आनंदी आनंद’ ही त्यांची प्रसिद्ध आणि पाठ्यपुस्तकांतील समावेशामुळे लोकांमधे अधिक रुळलेली कविता. त्यात ते म्हणतात-

    आनंदी आनंद गडे
    इकडे तिकडे चोहिंकडे
    वरती खालीं मोद भरे,
    वायूसंगें मोद फिरे,
    नभांत भरला,
    दिशांत फिरला,
    जगांत उरला,
    मोद विहरतो चोहिंकडे
    आनंदी आनंद गडे!
    याच बालकवींची ‘उदासीनता’ या शीर्षकाची कविता अशी आहे-
    कोठुनि येते मला कळेना
    उदासीनता ही हृदयाला?
    काय बोंचते तें समजेना
    हृदयाच्या अंतर्हृदयाला?
    येथें नाहीं तेथें नाही
    काय पाहिजे मिळवायाला?
    कुणीकडे हा झुकतो वारा?
    हांका मारी जीव कुणाला?
    मुक्या मनाचे मुके बोल हे;
    घरें पाडिती पण हृदयाला!
    तीव्र वेदना करिती, परि ती
    दिव्य औषधी कसली त्याला?
    वयाच्या अवघ्या अठ्ठाविसाव्या वर्षी अपघाती निधन झाल्यामुळे बालकवींचं कवितालेखनही अनेक अर्थांनी मर्यादितच राहिलं. त्यांना जेमतेम दहा-बारा वर्षं कवितालेखन करता आलं, आणि त्यांच्या एकूण कवितांची संख्याही आहे केवळ एकशे त्रेसष्ट.
    बालकवींचा जन्म जळगाव जिल्ह्यातील धरणगाव इथे झाला. त्यांचे वडील बापूराव देवराव ठोमरे पोलिसखात्यात नोकरीला असल्याने त्यांच्या सतत बदल्या होत. त्यामुळे बालकवींच्या शिक्षणात अडथळे आले. बालकवींना चार भावंडं होती. जिजी ही थोरली बहीण त्यांच्या विशेष जवळची होती. शिवाय अमृतराव आणि बाबू हे दोन भाऊ आणि कोकिळा ही बहीण होती. स्वदेशी, स्वराज्य अशा देशभक्तीच्या तत्कालीन कल्पनांच्या प्रभावामुळे बालकवींना तसेच त्यांच्या वडिलांना इंग्रजी शिक्षणाबाबत उत्साह नव्हता. त्यामुळे बालकवींचा बराचसा अभ्यास घरीच झाला. बालकवींची थोरली बहीण जिजी ऊर्फ लक्ष्मीबाई भावे यांनी त्यांना संस्कृतचं प्राथमिक शिक्षण दिलं; कवितेकडेही तिनेच वळवलं. बालकवींनी नंतर स्वतःच्या बळावर संस्कृतमध्ये प्रभुत्व मिळवलं. पंडिती कविता आणि शाहिरी कविता यांचाही त्यांचा अभ्यास होता.
    balkavi pustak 2.JPG
    वयाच्या तेराव्या वर्षी नवापूर इथे असताना त्यांनी पहिली कविता लिहिली. ह्या कवितेला त्यांनी शीर्षक दिलेलं नव्हतं. (बालकवींच्या समग्र कवितेचे संपादक प्रा. भा. ल. पाटणकर ह्यांनी तिला ‘वनमुकुंद’ असं नाव दिलं). जळगावमधे भरलेल्या पहिल्या मराठी कविसंमेलनात (१९०७) बालकवींनी केलेल्या काव्यवाचनामुळे प्रभावित होऊन संमेलनाध्यक्ष कान्होबा रणछोडदास कीर्तिकर ह्यांनी त्यांना ‘बालकवी’ हे नाव देऊन त्यांचा गौरव केला. तेव्हा त्यांचं वय १७ वर्षं होतं. त्यानंतर ‘बालकवी’ हे नाव रूढ झालं.
    १९०८मधे बालकवींच्या वडिलांचं निधन झालं. कुटुंबातील उर्वरित दोन भाऊ स्वातंत्र्य चळवळीत कार्यरत असल्यामुळे संसाराची जबाबदारी बालकवींवर येऊन पडली, तेव्हापासून नोकरीसाठी आणि पैशासाठी बालकवींची खटपट सुरू झाली. वडिलांच्या मृत्यूनंतर एका वर्षाच्या आत गडबडीने आणि बालकवींच्या मनाविरुद्ध त्यांची आई गोदूताई यांच्या पुढाकाराने बालकवींचा विवाह नाशिकच्या पार्वतीबाई जोशी यांच्याशी करून देण्यात आला. १९०९च्या दरम्यान शिक्षणासाठी काही काळ बडोद्याला असलेल्या बालकवींची तिथेच रेव्हरंड ना. वा. टिळक यांच्याशी गाठ पडली. बालकवींची हालाखीची परिस्थिती पाहून टिळकांनी त्यांना अहमदनगरला आपल्या घरी राहण्यासाठी आणलं. टिळकांच्या पत्नी लक्ष्मीबाई टिळक यांनी आपल्या ‘स्मृतिचित्रे’ या गाजलेल्या आत्मचरित्रात म्हटलं आहे, ‘ठोमरे हा बालकवी होता, पण तो कवीपेक्षा बालच अधिक होता.’
    यानंतरच्या काळात कधी कुटुंबियांच्या आग्रहामुळे तर कधी नोकऱ्यांमुळे पुणे व नगर अशा ठिकाणी बालकवींचा आयुष्याचा काळ विभागला गेला.
    १९१८च्या उन्हाळ्यात जिजींच्या मुलीच्या विवाहासाठी खानदेशातील भादली इथे आलेले असताना बालकवींना त्यांचे कवीमित्र के. म. सोनाळकर यांचं पत्र आलं व त्यांच्याकडे जाण्यासाठी घाईघाईने रेल्वेस्टेशनकडे निघालेल्या बालकवींचा पाय रूळामध्ये अडकला. याच वेळी येणाऱ्या ट्रेनखाली अडकून बालकवींचा मृत्यू झाला.
    balkavi - pustak 1.jpg
    अधिक वाचनासाठी-
    समग्र बालकवी – संपादक : नंदा आपटे (पॉप्युलर प्रकाशन)
    बालकवींची कविता : तीन संदर्भ – रमेश तेंडुलकर (मौज प्रकाशन)
    बालकवी समीक्षा – एस. एस. नाडकर्णी
    बालकवींचे काव्यविश्व – म. सु. पाटील.
    फुलराणी – संपादक- कुसुमाग्रज (काँटिनेन्टल प्रकाशन)







    Balkavi

    From Wikipedia, the free encyclopedia
    BalKavi
    BornTryambak Bapuji Thombre
    13 August 1890
    Dharangaon,Dist-Jalgaon.(Maharashtra)
    Died5 May 1918
    Bhadali Railway Station,Dist-Jalgaon.
    NationalityIndian
    OccupationPoet
    Known forPoems in Marathi
    Tryambak Bapuji Thombre (1890–1918) was an Indian Marathi poet, whose pen name was Balkavi, also spelled as Baalkavi or Baal-kavi. Poems of Thombre deal with his love of nature and are marked by exuberant language. He spent some period of his childhood life with renowned writer and poet Narayan Tilak [ Narayan Vaman Tilak (6 December 1861 – 1919) was a Marathi poet from the Konkan region of then Bombay Presidency in British India, and a famous convert to Christianity.] And Laxmibai Tilak. Narayan Tilak was the person who identified the talent within Baalkavi and brought him to his home. Laxmibai Tilak had very motherly relation with Baalkavi. She mentioned some of sweet memories of Baalkavi in her autobiography 'smruti chitre'. [1]

    Notable work[edit]

    Some of his poems are very "dark" while most of them depict nature in a beautiful poetic manner.[1] Some notable poems written by Thombre are:
    • Phulrani
    • Audumber
    • Shraavan-maasii harshh maanasii
    • Anandi anand Gade jikade tikade chohikade
    hu

    References[edit]

    • Poems of Balkavi on Wikisource
    1. Jump up to:a b Datta, Amaresh (1987). The Encyclopedia of Indian Literature. Sahitya Akademi. ISBN 978-81-260-1803-1. Retrieved 2009-12-09.
    MENU
    0:00
    Recording of one of Balkavi's poem.

    Problems playing this file? See media help.